राज्यसरकार मंत्र्यांमध्ये इतकी असंवेदनशीलता येथे कुठून? : संभाजी राजे छत्रपती

0
slider_4552

कोल्हापूर :

राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. काही ठिकाणी तर गारपीटी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं झोपली आहेत.

गहू, ज्वारी, कापूस, सोयाबीन सह इतर महत्त्वाची हाती आलेली पीकं हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बींच्या पिकांसह फळबागांचंही नुकसान झालं आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. राज्य सरकारमधील कोणताही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरही फिरकलेला नाही. त्यावर माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकी असंवेदनशीलता येथे कुठून? असा संतप्त सवाल संभाजी राजे यांनी राज्यकर्त्यंना विचारला आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून हा संताप व्यक्त केला आहे. अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत राज्यसरकारने आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार आणि कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल, असा संताप छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे.

हिंगोलीला अवकाळीचा फटका

हिंगोली जिल्ह्यात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी बहुतांश ठिकाणी विजेच्या गडगडाटसह प्रचंड पाऊस झाला. यावेळी गारपीटही झाली.वारा आणि अवकाळी पावसाने परिसरातील हरभरा, गहू, भाजीपाला, फळ बाग शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संत्रा तोडणीला आला होता. अनेक शेतकऱ्यांची संत्रा बाग विकलीही नव्हती. वादळी वाऱ्याने संत्रा, केळी, आंबा जमीनदोस्त झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे संत्रा, आंबा, केळी उत्पादकांना फटका बसला आहे. झाडांवरील संत्रा, आंबा गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे.

https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1637292088860737536?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1637292088860737536%7Ctwgr%5E509238f193efe5a819d4171a3b881c0be6778aa1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर घुमणार, ठाकरेंनी मैदान मारले !