मुंबई :
राज्यातील शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या असून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरराज्यातील शाळा यंदा १५ जून रोजी सुरू होणार आहेत. तर विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्या ठिकाणी ३० जूनपासून शाळा सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे.
मुलांना व पालकांना आपल्या सुट्यांचे व्यवस्थित नियोजन करता यावे यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचे दिपक केसरकर म्हणाले.
शिक्षणमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. केंद्र सरकारचा नवभारत साक्षरता कार्यक्रम राज्यात लागू केला जाणार आहे. यापुढे सरकारी व महापालिका तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेचपाठ्यपुस्तकात प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.
२० मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे. शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.