मावळ गोळीबार घटनेची 12 वर्षें, पवनानगर इथे शहीद शेतकऱ्याना श्रद्धांजली अर्पण.

0
slider_4552

मावळ :

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा यासाठी पवनामाईच्या रक्षणार्थ 9 ऑगस्ट 2011 रोजी पवन मावळ भागातील सामान्य शेतकरी बांधवांनी आंदोलन केले होते. पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर झालेल्या मावळ गोळीबार घटनेला आज (9 ऑगस्ट) 12 वर्षे पूर्ण झाले. या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या 12 व्या स्मृती दिनानिमित्त शिवप्रसाद मंगल कार्यालय (पवनानगर) इथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी येळसे गावातून स्मृती ज्योत पेटवून
गोळीबारात मृत पावलेले शेतकरी कांताबाई ठाकर, शामराव
तुपे, मोरेश्वर साठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा यासाठी
पवनामाईच्या रक्षणार्थ 9 ऑगस्ट 2011 रोजी पवन मावळ
भागातील सामान्य शेतकरी बांधवांनी आंदोलन केले होते. हे
आंदोलन हाताळताना पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले होते. कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, शामराव तुपे या शेतकऱ्याचा या गोळीबारात मृत्यू झाला होता. तर अन्य काही शेतकरी जखमी झाले होते. या शहीद शेतकऱ्याना
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नेते आणि तालुक्यातील नागरिकांकडून शहीद स्मारकाच्या इथे अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिवप्रसाद मंगल कार्यालय इथे सामूहिक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.

“पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यत भारतीय जनता पार्टी शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी हा लढ़ा सुरूच ठेव्णार”- रविंद्र भेगडे (तालुकाध्यक्ष – मावळ भाजपा)

पवना ही मावळच्या शेतकयांची आस्था आणि अस्मिता
आहे. तिच्या पाण्यासाठी ज्या शेतकऱ्यानी प्राणपणाला लावून स्वतचे बलिदान दिले, त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय कायम असून, तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” – बाळा भेगडे (माजीआमदार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष)

यावेळी ज्येष्ठ नेते शंकर शेलार, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दादाजी
जांभूळकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, पुणे जिल्हा किसान संघाचे अध्यक्ष ,ॲड फड़के साहेब, माजी पं.स. सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी पं.स. सभापती एकनाथ टिळे साहेब, प्रशांत ढोरे, पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष सोपानराव म्हाळसकर,
माजी पं.स. सभापती गुलाबराव म्हळसकर, शांताराम कदम, अमोल शेटे, मावळ शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, आर.पी.आय. मावळ तालुका अध्यक्ष नारायण भालेराव; माजी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, सुमित्रा जाधव, रामदास गाईे, चंद्रचूड महाराज, युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, गणेश ठाकर, संदीप भुतडा, युवा नेते एकनाथ पोटफोड, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, महागाव चांदखेड जिल्हां परिषद गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आइकर, महागाव गणाचे अध्यक्ष नारायण बोडके, बाळासाहेब जाधव, किरण राक्षे, वसंत म्हसकर, कामशेत शहर युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष प्रवीण शिंदे, बंटी भेगडे यांच्यासह पवन मावळ भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  खासदार अमोल कोल्हे यांनी शब्द पाळत बैलगाडा शर्य़तीत भाग घेऊन घोडीवर बसले