मुंबई सेन्ट्रल टर्मिनस चे बदलणार नाव !

0
slider_4552

मुंबई :

आर्थिकदृष्ट्या विकसित असलेल्या मुंबईचा पाया एका मराठी माणसाने, नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांनी रचला.

मुंबईः महाराष्ट्रात सध्या नामांतराच्या मुद्द्यांवरुन राजकारण तापले आहे. त्यातच आता मुंबईतील स्थानकांच्या नामांतराचा मुद्दाही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनस’चे ‘नाना शंकरशेट टर्मिनस’ असे नामकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. तसंच, याबाबत सकारात्मक पत्रदेखील गृहराज्यमंत्र्यांनी अरविंद सावंत यांना लिहलं आहे.

भारतातील पहिल्या रेल्वेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी नाना शंकरशेठ यांनी अथक प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या विकसित असलेल्या मुंबईचा पाया एका मराठी माणसाने, नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांनी रचला. प्रसंगी स्वतःचा वाडा रेल्वे कार्यालयासाठी देऊ केला होता. त्यामुळे तत्कालीन इंग्रज सरकारने त्यांचा यथोचित सन्मान करुन रेल्वेचा सोन्याचा पास दिला. तसंच, मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातील दर्शनी भिंतीवर नानांचा पुतळा बसविला आहे.

See also  कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोरोना काळजी केंद्र सुरू करण्यास मान्यता : पणन मंत्री