पुणे :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कारागृहात चांगली वर्तणूक आणि निकषानुसार पात्र असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १८६ कैद्यांना स्वातंत्र्यदिनी मंगळवारी (ता. १५) कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.




याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कारागृहात चांगली वर्तणूक आणि निकषानुसार पात्र असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील १८६ कैद्यंना उद्या कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.
या कैद्यांची पात्रता तपासण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने एकूण तीन टप्प्यांत ५८१ कैद्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या प्रस्तावास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैदी, दुसऱ्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैदी कारागूहातून मुक्त करण्यात आले आहेत. तर तिसच्या टप्यात येत्या १५ ऑगस्ट रोजी१८६ कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे. कैद्यांमध्ये शिस्त आणि त्यांच्या आचरणात सुधारणा व्हावी, हा माफी योजनेचा उह्देश आहे. कारागृहातून सुटका होणाऱ्या कैद्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक व्हावे,” असे आवाहन राज्य कारागूह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केले.








