बाणेर :
वसुंधरा अभियाना अंतर्गत कोरोना काळातही अविरतपणे वृक्ष रोपणाचे व संवर्धनाचे काम केले गेले. याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोना काळात टेकडीवर अविरत पर्यावरण संवर्धन कार्य केल्या बद्दल पर्यावरण मित्र बहूऊद्देशीय संस्था यांच्या कडून वसूंधरा अभियान संस्थे चा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान चिन्ह सन्मान करण्यात आला. कोरोना च्या प्रतिकुल परिस्थितीत विशेष पोलीस परवानगी घेऊन संस्थे ने हजारो झाडे जगवली. निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.