उत्तर प्रदेशात उष्माघातामुळे 72 तासांत 54 मृत्यू   

0
slider_4552

उत्तर प्रदेश :

एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर, दुसरीकडे मान्सूनची हुकलावणी देत असतानाच उत्तर प्रदेशात वेगळेच परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर सुरु आहे. उष्माघातामुळे 72 तासांत 54 मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. तर, 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, या स्थितीबाबत आरोग्य यंत्रणेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ उष्माघातामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होणे शक्य नाही. यामुळे यामागे वेगळे कारण देकील असू शकते अशी शंका आरोग्य यंत्रणेने उपस्थित केली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येणार असल्याचे समजते.

बलिया येथील सर्व रुग्णालये भरली आहेत. 15 ते 17 जून या तीन दिवसांत 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी फक्त जिल्हा रुग्णालयातील आहे. खाजगी रुग्णालयातील तपशील समोर आलेला नाही. संपूर्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये देखील अशा प्रकारे रुग्ण दाखल झालेले असावेत अशी शंका देखील उपस्थित केली जातेय.

छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास आणि ताप

रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या या रुग्णांना ताप येत असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. अधिकांश रुग्णांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. यामुळे हे मृत्यू केवळ उष्माघातामुळे झाले नसावेत अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. यामुळे ज्या परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. तेथील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जाणार असल्याचे वरिष्ठ सरकारी डॉक्टर ए.के. सिंग यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत.

See also  किसान आंदोलनाचा पायी मोर्चा रद्द !