पाषाण :
अखंड भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या कृपाशीर्वादाने लाखो निरंकारी सेवकांनी आज ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान द्वारे राम नदी सह पाषाण तलाव क्षेत्रातील दिड किलो मीटर परिसरातील पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा , अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन २५ दोन कचरा स्वच्छ करण्यात आला. यावेळी नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास ११०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली. ‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना, कुकडी, मीना, वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४१ ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आले आहे .
या परियोजनेअंतर्गत आज २६ फेब्रुवारी २०२३ रोजी, एकाच दिवशी संपूर्ण भारतभर निरंकारी मिशनच्या सुमारे १ .५ लाखहुन अधिक स्वयंसेवकानी समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीर, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता केली तसेच जल संरक्षणाची प्रेरणा दिली.
पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदांनी यांनी या परियोजने विषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की, यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ५००० हून अधिक संख्येने सहभागी झाले होते. ‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्या साठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली, तसेच पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीतकार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश होता.
परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयत्न आहे असे गौरवोद्गार खासदार वंदनाताई चव्हाण यांनी काढले.
यावेळी खासदार वंदना चव्हाण, झोनल प्रमुख ताराचंद करमचंद, गिरिधारी बुगाटीची, ॲड.प्रदीप मुळे, किसन आडवाणी, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेवक सनी निम्हण, राहुल कोकाटे, सचिन दळवी, शिवम सुतार, समीर उत्तरकर, अशोक दळवी, अमित खाणेकर, मृणाल निम्हण, अंकुश सुतार, सुमित सोनार, निर्मला सचदेव, सुवर्णा मोरे, जानकु भांडे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या स्वच्छता अभियानासाठी शिवम सुतार यांच्या माध्यमातून सुरक्षितेसाठी मास्क आणि हॅन्ड ग्लोज भेट स्वरूपात देण्यात आले.