पवना :
पवना टेंट व्यावसायिकांच्या विविध समस्या जाणून
घेण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगड़े स्वतः पवनानगर परिसरात आले होते. पर्यटनाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पवना मावळ भागातील टेंट व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना येणाऱ्या अनेक समस्या जाणून घेतल्या.
यावेळी उपस्थित अनेक व्यावसायिकांनी विविध समस्यां मांडल्या. यावेळी बाळा भेगडे यांनी उपस्थितांच्या सर्व समस्या ऐकल्या., त्यानंतर सर्वानी रीतसर वीज जोडणी करून घ्यावी, आपण वीज महावितरण कडुन थोडा कालावधी मागून घेऊ. जेणेकरून सर्वाचे रितसर वीज कनेक्शन होउन जाईल.
सांडपाण्याची व्यवस्था सगळ्यांची ठीक आहे. परंतु ज्यांची कोणाची नाहीये त्यांनी त्वरित सांडपाण्याची व्यवस्था आपल्या जागेत शोष खड्डे घेऊन करावी. तसेच बाळा भेगडे यांनी सदरचा व्यावसाय हा अधिकृत करण्यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलने चालू असल्याचेही सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले …माझ्या धरणग्रस्त व्यावसायिक बांधवासाठी मी कायम एक पाउल पुढे आहे. जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे तिथे हाक द्या तुमच्या हाकेला मी लगेचच उपस्थित असेल. परंतु पवना धरणाचे पाणी है तुमच्यासह मावळ तालुका आणि पिंपरी चिंचवड चे लोक देखील हेच पाणी पीत असल्यामुळे त्याचे प्रदूषण होणार नाही याची देखील काळजी घ्या”-
मावळ तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणुन घोषित झाल्याने
स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. याचा पुरेपूर फायदा घेण्याचे ही सांगितले. त्यांचा अनुभव सांगताना त्यांनी स्वतः देखील एक शाकाहारी हॉटेल कसे चालविले है देखील आवर्जून सांगितले. ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना नवीन ऊर्जा मिळाली.
यावेळी भाजपा मावळचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड, मावळ विधानसभा प्रमुख रविंद्र भेगडे,नितीन मराठे, किसन खैरे, नारायण भालेराव,गणेश ठाकर, सरपंच नारायण बोडके, भारत काळे,ज्ञानेश्वर ठाकर, निवृत्ती ठाकर, दत्ता ठाकर, प्रकाश ठाकर,माऊली आढाव, बाळासाहेब मोहोळ, संजय मोहोळ, , सुधीर घरदाळे,बबन ठाकर,धर्मेंद्र ठाकर, अशोक ठाकर, नवनाथ कारके, अंकुश ठाकर,अविनाश घानिग, गणेश मानकर, आणि इतर व्यावसायिक
मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
किसन खैरे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर बाळासाहेब मोहोळ यांनी सर्वाचे आभार मानले.